कश्मिरला? मुलाला घेऊन एकटी? वेडी आहेस का? कशाला रिस्क घेतेस? तिथली परिस्थिती माहीत आहे ना कशी आहे?
ज्यांना माझ्या आणि अविघन्यच्या टूर बद्दल सांगितलं, त्यांच्याकडून ह्या अशा प्रतिक्रिया अपेक्षित होत्याच. म्हणून फार लोकांना सांगितलं नाही. कसं असतं, आपण खूप मनाचा हिय्या करून संपूर्ण विचारांती एखादी गोष्ट ठरवतो आणि फक्त कोणाला सांगितल्यानंतर त्यातल्या आपण विचार केलेल्या बाबींचा दुसराच अँगल समोरचा सांगतो आणि आपल्या निर्णयाचा भक्कम पाया त्याने डगमगण्याची शक्यता असते. भरीस भर म्हणजे निघायच्या दोनच दिवस आधी अशी घटना घडली की हा निर्णय खरंच बतोबार घेतला का आपण ह्या विचाराने डोक्याचा भुगा झाला होता. लेकाच्या स्कुल बस वाल्यानी बस नेहमीच्या वेळेपेक्षा 20 मिनिटे लवकर आणली, स्टॉप वर कोणीही नसताना त्याला उतरवलं आणि तो भलतीकडेच गेला. पोरगा दोन तास मिसिंग होता,ते दोन तास त्याला शोधताना मी जी गळून गेले होते की काही विचारता काम नये! सापडला खरा, पण ह्याने माझंच काय, आई-डॅडीचं सुद्धा टेन्शन आणखी शिगेला पोहोचलं. मन चिंती ते…. असो. तर दोघेच जायचं असं आधी काही ठरलं नव्हतं. पण नवऱ्याला ह्यावेळी वेळ नव्हता. हनिमून नंतर आम्ही एकही टूर केली नव्हती. शिवाय, मुलगा 6 वर्षांचा झाला. त्याची स्नोफॉल बघायची फार इच्छा होती आणि विमानात जायचं फॅसिनेशन होतं. नाताळच्या सुट्टीत भारतात डिसेंबरमध्ये कश्मीर पेक्षा सुंदर ठिकाण कोणतं होतं ह्या साठी? म्हणून कश्मीर.
मेक माय ट्रिप मधून नोव्हेंबरमध्ये बुकिंग केलं. जाताना आम्हाला मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-श्रीनगर आशा दोन फ्लाईट्स होत्या. 21 डिसेंबरला पहाटे सव्वापाचला निघालो. नवरा एअरपोर्टवर सोडायला आला होता. 7.45 ची फ्लाईट अर्धा तास डीले झालयाचा मेसेज कॅब मध्ये असतानाच आला होता. आत गेलो, चेक इन आणि सेक्युरिटी पूर्ण केली. आणि थोडा वेळ बसलो. 6.15 होऊन गेले होते. मग थोडं इकडे तिकडे फिरून त्याला चॉकलेट्स आणि मला वाचायला डेंनीअल स्टील चं ‘चाईल्डस प्ले’ घेतलं. ब्रेकफास्ट करून परत येऊन बसतो तर फ्लाईट अजून अर्धा तास लेट असल्याची अनौन्समेंट झाली. आता 8.45 ही नवी वेळ. 8.30 होऊन गेले तरी हे लोक बोर्डिंग सुरू करत नव्हते. म्हणे अजून आम्हाला क्लिअरन्स मिळाला नाहीये, दिल्ली मध्ये फॉग आहे. सगळे पॅसेंजर्स वैतागले होते. इंडिगोच्या सुंदरींना उत्तरं देता देता नाकी नऊ आले होते. म्हणून त्यांनी नवी वेळ आता नऊची केली. मी एकीला सांगितलं की माझी कनेकटिंग फ्लाईट आहे 12.35 ची दिल्ली वरून. तिने कोपऱ्यातला एक काउंटर कडे बोट करून सांगितलं की थोडा वेळ थांबा नाहीतर तिथे जाऊन बोला, ते तुम्हाला डायरेक्ट श्रीनगरच्या फ्लाइट वर टाकू शकतील. आता पावणें नऊ होऊन गेले होते. फिरायला जायचं म्हणून पहाटे साडेचार वाजता अगदी स्वतःहून उत्साहात उठलेले आमचे छोटे साहेब आता वैतागले होते आणि मला प्रश्न विचारून विचारून भंजाळून सोडलं होतं. आता ह्यांनी नवी बोर्डिंगची वेळ 9.40 ची केली. म्हणजे दिल्ली ला पोहोचणार 12 पर्यंत. टर्मिनल बदलून मी 12.35 ची दुसरी श्रीनगर ची फ्लाईट कशी घेणार होते? म्हणून मघाशी दाखवलेल्या त्या कोपऱ्यातल्या काऊंटर वर गेले. तिने सगळ्या गोंधळात माझं ऐकून माझ्यासाठी दुसरी फ्लाईट शोधायला सुरुवात केली. म्हणे डायरेक्त फलित नाही आमची श्रीनगर ला.
2.35 ची दिल्ली-श्रीनगर आहे म्हणे, ती आरामात मिळेल तुम्हाला. त्यात ती सीट्स आहेत का बघून माझं चेक इन केलेलं बॅगेज बाजूला काढून ठेवण्यासाठी कोणाला तरी फोन करत होती. तेव्हा कळलं की बॅगेज कधीच फ्लाईट मध्ये पोहोचलं होतं. मला सरळ श्रीनगर ला ते भेटणार होतं.म्हणजे आता ते 12.35 च्या फ्लाईटने गेलं तर माझ्या आधी श्रीनगरला पोहोचणार होतं!
पुन्हा चेक केल्यावर तिला कळलं की 12.35ची फ्लाईट सुद्धा अर्धा तास लेट झाली आहे. तिने अभिमानाने हसून सांगितलं, मॅम, नाऊ यु विल गेट दॅट फ्लाईट. हा त्यांच्या गोंधळलेल्या मॅनेजमेंट चा अभिमान होता की त्यामुळे फ्लाईट डिले होणारच हा तिचा विश्वास खरा ठरल्याचा अभिमान होता हे मात्र सांगणं कठीण होतं. तर 9.40 ची वेळ मात्र इंडिगोने पाळली आणि फायनली आम्ही बोर्ड केलं. पोराचा उत्साह पुन्हा वाढला. पहील्यांदा विमान प्रवास करायची उत्सुकता आणि तो दाखवण्याची पद्धत वयाला अनुसरूनच होती, पण मला तरी मध्येच हसू येत होतं. साहेबांसाठी दोन्ही फ्लाईट्स मध्ये आम्ही विन्डो सीट घेतली होती. कानात आईने ने दिलेले इअर प्लग्स घातले होते, तरी त्याचे कान लँड होई पर्यंत थोडे दुखू लागले होते.म्हणून जरा कुरकुरत होता.
12.05 वाजता दिल्लीला लँड झालो. आत सांगितलेलं 11 डिग्री तापमान बाहेर पडल्यावर लगेच बोचयला लागलं. मुबंईकरांसाठी 11 डिग्री म्हणजे “खूप थंडी”. हा विचार मनात आल्यावर देव म्हणाला असेल पण खरी गंमत पुढेच आहे! पुढची फ्लाईट अजून अर्धा तास डिले झाल्याचा मेसेज आला. नवी वेळ 1.10ची होती, बोर्डिंग 12.35ला. तर आता टर्मिनल बदलायचं होतं दुसऱ्या फ्लाईट साठी. मला वाटलं होतं असेल जवळ, पोहोचू पटकन. उतरल्यावर एअर्बसमध्ये चढायच्या आधी तिथल्या असिस्टंटसना विचारलं तर म्हणे 20-25 मिनिटे लागतील इथून. 12.15 होऊन गेले होते. एअर बसने टर्मिनल ला पोहोचल्यावर एका अससिस्टंटने एका काउंटरवर जाऊन काहीतरी बोलून कॅब करून दिली. ड्रायव्हरला विचारलं तर म्हणे 15 मिनिटे लागतील. वाटेत ट्राफिक लागलं थोडं. अविघन्य चे कान अजूनही दुखत होते. तो म्हणू लागला इथून आपण कारने जाऊया मम्मा. त्याला कसंतरी समजावलं. 12.30 झाले. म्हटलं आता काही खरं नाही. 12.35 ला त्या दुसऱ्या टर्मिनल ला पोहोचलो. सेक्युरिटी करून बोर्डिंग गेट वर धावत धावत पोहोचलो तर फायनल कॉल चालू होता. धावतच एअरबसमध्ये पोहोचलो.
फ्लाईट मध्ये माझ्या शेजारी श्रीनगर ची एक बाई. माहेरी कोणीतरी वारलं होतं म्हणून अर्जंटली पहिल्यांदाच एकटी फ्लाईट ने चालली होती. आधीच मला बोलून टेक ऑफ आणि लँडिंग ला माझा हात घट्ट धरून ठेवला होता 😊
छान गप्पा मारत आलो. तिथली जुजबी माहिती तिच्या कडून घेतली आणि तिने तिचा फोन नंबर सुद्धा घेऊन ठेवला. बोलली काहीही लागलं तरी कधीही फोन कर. आणि एअरपोर्टवरच मुलाचे कपडे बदल, त्याला थर्मल्स आणि दुसरा जॅकेट घाल, खूप थंडी आहे. प्रवासात भेटलेली पहिली चांगली व्यक्ती. श्रीनगर ला उतरल्यावर ड्रायव्हरने फोन केला, तो बाहेर थांबलेलाच होता. 3.30 झाले होते.
बाहेर पडताच थोडा बर्फ दिसल्याबरोबर लेक खुश! त्याला ग्लोव्हज आणि वुलन कॅप घातली. गाडीत बसल्यावर फोन बघते तर व्हाट्सएप वर शेवटचा मेसेज 12.20 ला. ड्रायव्हरला विचारलं हॉटेलमध्ये वाय फाय असेल ना.
“मॅडम, नेट तो यहा 4 महिनोसे बंद है।“
स्ट्राईक 1: म्हणजे 4 दिवस घरी व्हिडीयो कॉल्स नाही, सगळीकडे फिरू पण एकही फोटो कोणालाही शेअर करता येणार नाही की एफबी इंस्टा वर टाकता येणार नाही. इतका काळ नेट जवळ नसल्याची ही पहिलीच वेळ. त्यात एकटी मुलाला घेऊन बाहेर आलेली असताना.
पण म्हटलं असुदे. आपल्याला काय फिरायचं आहे, मजा करायची आहे. तसंही लेक अगदी किंग ऑफ मिस्चीफ आहे, त्याच्या कडे व्यवस्थित लक्ष देता येईल, कसलंच डिस्ट्रक्शन नको. आई डॅडीनी अगदी कडक शब्दात त्याची नीट काळजी घ्यायचं आणि त्याला अजिबात एकटं सोडायचं नाही हे बजावलं होतंच. ही आम्हा दोघांना जाऊ देण्याची त्यांची बेसिक अट होती. हॉटेल, रूम सगळं छान होतं, पण थंडी मरणाची. हिटरला काही ऐकत नव्हती. रात्र होत गेली तशी थर्मल्स, त्यावर कपडे, त्यावर जॅकेट आणि ग्लोव्हज, सॉक्स आणि कानटोपी इतका जामानिमा असून सुद्धा कुडकुडत होतो. मला कळेना की गारवा येतोय कुठून ह्या बंद खोलीत. शेवटी खिडकीचा पडदा बाजूला सारून नीट बघितलं तर एका बाजूचं तावदान उघडं होतं, तिथे जाळीचं दार होतं. ते उघडून बाहेरचं खिडकीचं तावदान लावलं आणि जाळीचे दार लावून घेतलं. खिडकीला लागून लांबच लांब एक युनिट होतं ज्याला संपूर्ण आत पाईप्स होते रूम मध्ये सोडलेले. त्यातून पण गार हवा येत होती. काय होतं कुणास ठाऊक. त्यावर बेडवरच्या मोठ्या उशा लावल्या.तेव्हा गारवा गेला बऱ्यापैकी. लेकाला थंडीची तशी काही चिंता नव्हती. त्याला मोबाईल मिळाला नाही नेट नाही म्हणून. पण टी.व्ही होता त्याच्या दिमतीला. मराठी चॅनेल्स नव्हते पण त्याचे कार्टून्स चालू होते.
दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून साईटसीइंग ला निघालो. पहिल्यांदा डोंगराच्या माथ्यावर असलेलं शंकराचार्य मंदिर पहायचं होतं. जमिनीपासून 1000 फूट उंच असलेल्या मंदिराला जवळजवळ 250 पायऱ्या आहेत. हे मंदिर नवव्या शतकात काश्मीरच्या संदिमान राजाने बांधल्याची आख्यायिका आहे. त्यानंतर झालेल्या अनेक राजांनी मंदिराचं दुरुस्ती काम केलं आणि मंदिराला नीट मेंटेन केलं. ह्यात काही मुस्लिम राजे ही होते. हे पूर्वी बुध्द लोकांचं ही मंदिर मानलं जायचं. पण श्री आदी शंकर इकडे येऊन गेल्या नंतर ह्या मंदिराचं नाव शंकराचार्य मंदिर पडलं. ह्या बद्दल एक अशीही आख्यायिका आहे की गोपादित्य राजाने 371 बी.सी काळात गोपाद्री डोंगरावरची ही जागा ब्राह्मणांना मंदिर बांधण्यासाठी दिली होती. त्याच्या आजूबाजूला त्याने भुक्सीर्वतीका नावाचं गाव वसवले. मंदिराचं बांधकाम आणि पायऱ्या संपूर्ण दगडी आहेत. त्यामुळे आणि इतक्या उंचावर असल्यामुळे थंडी जास्तच जाणवते. वर मोबाईल न्यायला मनाई होती. म्हणून ते अर्धा किलोमीटर लांब उभ्या केलेल्या गाडीतच ठेवून निघालो. माझं सेक्युरिटी चेक झालं आणि तिथे तैनात असलेल्या crpf च्या जावनाने पाहिलं की आम्ही दोघेच वर चाललो आहोत. त्याने आम्हाला थांबवून संपूर्ण डिटल्स रजिस्टर मध्ये लिहायला सांगितले, “आपके साथ कोई मेल नाही है ना. आप और बच्चा ही है”
वर चढताना अक्षरशः दहा पायऱ्या चढून थांबावं लागत होतं. हातपाय गोठले जात होते जणू. श्वास घेताना पण नाका तोंडातून वाफा येत होत्या आणि गार वाऱ्यात घेतलेल्या श्वासांनी शरीर आतून सुद्धा गार पडत होतं. वर पोहोचलो. वरून संपूर्ण श्रीनगर शहर दिसत होतं. अथांग पसरलेला दाल सरोवर जणू अर्धाअधिक शहराला वेढा घालून बसला होता, एखाद्या राजाच्या डोक्यावरच्या भल्या मोठ्या मुकुटासारखा! गाभाऱ्यात जायला आणखी उभ्या उंच आणि पाण्याने भिजलेल्या पायऱ्या होत्या. सॉक्स आणि बूट काढून त्यावर चढावं लागलं. पाय बधीर झाले दर्शन घेऊन सॉक्स घालेपर्यंत. तिथल्या दोघा-तिघानी शेकोटी केली होती त्याजवळ जरा थांबलो आणि मग खाली उतरलो. खाली काही लोकांनी भंडारा चालू केला होता. तिथे त्यांनी खायला लावलं. मस्त गरमागरम पुऱ्या, चण्याची भाजी आणि खीर. ब्रेकफास्ट करून आलो होतो म्हणून थोडंसं खाऊन निघालो.
पुढे आम्हाला मुघल गार्डन्स ना जायचं होतं. तसे 6 गार्डन्स आहेत. पण आम्ही 3 गार्डन्स पाहिले: चेश्मा शाही, निशात बाग आणि शालिमार बाग.दुसऱ्या शतकात बनवली गेलेली ही गार्डन्स आहेत. शालिमार बाग जहांगीर राजाने त्याच्या राणीला खुश करण्यासाठी बांधलं होतं.त्याच्या ह्या ड्रीम प्रोजेक्ट ला त्याने ‘फराह बक्ष’ असं नाव दिलं होतं. शालिमार बागेला प्रेमाचं निवासस्थान (abode of love) असंही म्हटलं जातं.सीझन नव्हता म्हणून गार्डन्स मध्ये फार काही बघायला नव्हतं. एप्रिल ते जून ही गार्डन्स अतिशय सूंदर रंगबेरंगी फुलांनी बहरलेली असतात. दिवसा जिथवर नजर जाईल तिथवर रंगांची उधळण आणि संध्याकाळी विविध रंगांच्या लाईट्सने वेढलेले उंच उंच अनेक फाउंटन्स. अशी ह्या गार्डन्स ची ख्याती होती, पण आमच्या नशिबात ते बघणं नव्हतं कारण आम्ही गेलो होतो डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत. सगळी झाडं सुकली होती. थंडीने जणू सगळं सौंदर्य रीतं करून टाकलं होतं.
तरी फोटो काढले.
काही काश्मिरी पोशाखात सुद्धा.
निशात आणि शालिमार बागेत थंडीत ही तग धरून जिद्दीने उभी राहिलेली थोडी फुलं दिसली.
शालिमार बागेत अचानक माझा फोन लो बॅटरी म्हणत स्विच ऑफ झाला. पूर्ण चार्ज करून आणलेला हॉटेल मधून, तीन तासात काय झालं कुणास ठाऊक. आता ड्रायव्हर ला कसं कॉन्टॅक्ट करणार? पण सुदैवाने तो बागेच्या बाहेरच उभा होता. पटकन त्याला फोन गाडीत चार्ज करायला लावायला सांगितलं. आणखी पुढे फोटो काढायचे होते.
तिन्ही गार्डन्स बघून झाल्यावर मग जेवलो. फ्लाईट मध्ये भेटलेल्या स्त्रीने काश्मीरी वाझवान नक्की ट्राय कर सांगितलं होतं. पण त्यातल्या सगळ्या डिशेस मटणाच्या बनवल्या जातात हे नंतर कळलं. कुठेच चिकन मध्ये नाही मिळालं. टूर मधला काश्मिरी काहवा मात्र घेतला. खरंतर साधा पिवळसर उकळून आणलेला चहा..पण चव!! फार सुंदर. थंडीत जणु संजीवनी! मी चहा घेत नाही, पण काहवा तिथे रोज प्यायले.
पुढे ड्रायव्हरने त्याच्या ओळखीच्या एक दुकानात नेलं. तिथे थोडा सुका मेवा आणि केशर घेतलं. अक्रोड आणि बदाम हाताने तोडून आणि दाबून त्यातून तेलाचा अंश निघताना मी तरी पहील्यांदाच पाहिलं त्या दुकानात. इतका अस्सल मेवा होता तिकडचा. तिथून दाल लेक ला गेलो. तिथे बोटिंग आणि थोडं साईटसीइंग केलं. दाल लेक म्हणजे पाण्यावर वसलेलं दोन लाखाहून अधिक लोकसंख्या असलेलं गावच होतं. समोर सगळ्या रांगेत हाऊसबोट्स होत्या आणि त्यांच्यापालिकडे गाव. जसं आपल्याकडे बाजारात किंवा कुठेही जायला टू व्हीलर्स-फॉर व्हीलर्स असतात तशी ह्याच्याकडे रो बॉट्स असतात.. आमचा गाईड कम नाविक म्हणे हॉटेल पेक्षा अतिशय सुंदर व्यवस्था असते इथे राहण्याची आणि खाण्याची.. मिशन काश्मीर सिनेमा आणि त्यातलं 'भूमरो भूमरो' गाणं ज्या हाऊसबोट मध्ये शूट झालं होतं तीही गाईडने दाखवली. तिथे कमळाचा आणि त्याखाली येणाऱ्या कमळककडीचं उत्पन्न होतं तो भाग त्याने दाखवला. कमळककडीची भाजी काश्मीर मध्ये खुप खाल्ली जाते, फेमस आहे. त्याच सोबत तिथे आणखी ही भाजीचं उत्पन्न घेतलं जातं म्हणे. पलीकडे हाऊसबोट मध्ये मालक राहतात. पण ह्या भागातून कोणी कधी काही काढून नेलं तर कोणालाच पत्ता लागत नाही. म्हणून ह्या भागाला म्हणे ‘चोरीका बागान’ म्हणतात
हया वेळेस सायबेरिया मधून स्थलांतर करून अनेक काळे बदक दाल लेक मध्ये येतात. त्यांना फ्लाईंग डक्स म्हटलं जातं. त्यांचे थवे च्या थवे पाहिले. सुर्यास्त होत आला होता. अतिशय सुंदर असं दृश्य होतं डाक सरोवरचं.
मधेच एक बाई अगदी बोटीच्या काठावर बसून आरामात बोट रो करून आमच्या समोरून निघून गेली, जशा आपल्याकडे गाड्या तशा तिथे तलावात बोटी. गम्मत वाटली. शेवटी नाविकाने तिथल्या लोकल मार्केट कडे नाव वळवली. ह्याचं नाव ‘मीना बझार’, पण ह्याला ' फ्लोटिंग मार्केट' असं ही म्हटलं जातं म्हणे. अख्खा बाजार होता तलावात..अगदी आपल्या रस्त्यावरच्या बाजारासारखा!
बोटीतून उतरेपर्यंत संध्याकाळी सव्वापाच होऊन गेले होते. बोटीत काढलेल्या फोटोंसाठी पैसे देता देता अचानक थंडी इतकी वाढली की हात पाय थरथरू लागले, दात वाजू लागले. पटकन गाडीत बसलो आणि हॉटेलवर आलो. ड्रायव्हर म्हणे इथे असंच टेम्प्रेचर ड्रॉप होतं, पटकन, कधीही. पावणे सहा वाजताच अंधारलं होतं! दिवस छान गेला. आता उद्या इथे चेक आउट करून गुलमर्ग ला जायचं होतं.
ज्यांना माझ्या आणि अविघन्यच्या टूर बद्दल सांगितलं, त्यांच्याकडून ह्या अशा प्रतिक्रिया अपेक्षित होत्याच. म्हणून फार लोकांना सांगितलं नाही. कसं असतं, आपण खूप मनाचा हिय्या करून संपूर्ण विचारांती एखादी गोष्ट ठरवतो आणि फक्त कोणाला सांगितल्यानंतर त्यातल्या आपण विचार केलेल्या बाबींचा दुसराच अँगल समोरचा सांगतो आणि आपल्या निर्णयाचा भक्कम पाया त्याने डगमगण्याची शक्यता असते. भरीस भर म्हणजे निघायच्या दोनच दिवस आधी अशी घटना घडली की हा निर्णय खरंच बतोबार घेतला का आपण ह्या विचाराने डोक्याचा भुगा झाला होता. लेकाच्या स्कुल बस वाल्यानी बस नेहमीच्या वेळेपेक्षा 20 मिनिटे लवकर आणली, स्टॉप वर कोणीही नसताना त्याला उतरवलं आणि तो भलतीकडेच गेला. पोरगा दोन तास मिसिंग होता,ते दोन तास त्याला शोधताना मी जी गळून गेले होते की काही विचारता काम नये! सापडला खरा, पण ह्याने माझंच काय, आई-डॅडीचं सुद्धा टेन्शन आणखी शिगेला पोहोचलं. मन चिंती ते…. असो. तर दोघेच जायचं असं आधी काही ठरलं नव्हतं. पण नवऱ्याला ह्यावेळी वेळ नव्हता. हनिमून नंतर आम्ही एकही टूर केली नव्हती. शिवाय, मुलगा 6 वर्षांचा झाला. त्याची स्नोफॉल बघायची फार इच्छा होती आणि विमानात जायचं फॅसिनेशन होतं. नाताळच्या सुट्टीत भारतात डिसेंबरमध्ये कश्मीर पेक्षा सुंदर ठिकाण कोणतं होतं ह्या साठी? म्हणून कश्मीर.
मेक माय ट्रिप मधून नोव्हेंबरमध्ये बुकिंग केलं. जाताना आम्हाला मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-श्रीनगर आशा दोन फ्लाईट्स होत्या. 21 डिसेंबरला पहाटे सव्वापाचला निघालो. नवरा एअरपोर्टवर सोडायला आला होता. 7.45 ची फ्लाईट अर्धा तास डीले झालयाचा मेसेज कॅब मध्ये असतानाच आला होता. आत गेलो, चेक इन आणि सेक्युरिटी पूर्ण केली. आणि थोडा वेळ बसलो. 6.15 होऊन गेले होते. मग थोडं इकडे तिकडे फिरून त्याला चॉकलेट्स आणि मला वाचायला डेंनीअल स्टील चं ‘चाईल्डस प्ले’ घेतलं. ब्रेकफास्ट करून परत येऊन बसतो तर फ्लाईट अजून अर्धा तास लेट असल्याची अनौन्समेंट झाली. आता 8.45 ही नवी वेळ. 8.30 होऊन गेले तरी हे लोक बोर्डिंग सुरू करत नव्हते. म्हणे अजून आम्हाला क्लिअरन्स मिळाला नाहीये, दिल्ली मध्ये फॉग आहे. सगळे पॅसेंजर्स वैतागले होते. इंडिगोच्या सुंदरींना उत्तरं देता देता नाकी नऊ आले होते. म्हणून त्यांनी नवी वेळ आता नऊची केली. मी एकीला सांगितलं की माझी कनेकटिंग फ्लाईट आहे 12.35 ची दिल्ली वरून. तिने कोपऱ्यातला एक काउंटर कडे बोट करून सांगितलं की थोडा वेळ थांबा नाहीतर तिथे जाऊन बोला, ते तुम्हाला डायरेक्ट श्रीनगरच्या फ्लाइट वर टाकू शकतील. आता पावणें नऊ होऊन गेले होते. फिरायला जायचं म्हणून पहाटे साडेचार वाजता अगदी स्वतःहून उत्साहात उठलेले आमचे छोटे साहेब आता वैतागले होते आणि मला प्रश्न विचारून विचारून भंजाळून सोडलं होतं. आता ह्यांनी नवी बोर्डिंगची वेळ 9.40 ची केली. म्हणजे दिल्ली ला पोहोचणार 12 पर्यंत. टर्मिनल बदलून मी 12.35 ची दुसरी श्रीनगर ची फ्लाईट कशी घेणार होते? म्हणून मघाशी दाखवलेल्या त्या कोपऱ्यातल्या काऊंटर वर गेले. तिने सगळ्या गोंधळात माझं ऐकून माझ्यासाठी दुसरी फ्लाईट शोधायला सुरुवात केली. म्हणे डायरेक्त फलित नाही आमची श्रीनगर ला.
2.35 ची दिल्ली-श्रीनगर आहे म्हणे, ती आरामात मिळेल तुम्हाला. त्यात ती सीट्स आहेत का बघून माझं चेक इन केलेलं बॅगेज बाजूला काढून ठेवण्यासाठी कोणाला तरी फोन करत होती. तेव्हा कळलं की बॅगेज कधीच फ्लाईट मध्ये पोहोचलं होतं. मला सरळ श्रीनगर ला ते भेटणार होतं.म्हणजे आता ते 12.35 च्या फ्लाईटने गेलं तर माझ्या आधी श्रीनगरला पोहोचणार होतं!
पुन्हा चेक केल्यावर तिला कळलं की 12.35ची फ्लाईट सुद्धा अर्धा तास लेट झाली आहे. तिने अभिमानाने हसून सांगितलं, मॅम, नाऊ यु विल गेट दॅट फ्लाईट. हा त्यांच्या गोंधळलेल्या मॅनेजमेंट चा अभिमान होता की त्यामुळे फ्लाईट डिले होणारच हा तिचा विश्वास खरा ठरल्याचा अभिमान होता हे मात्र सांगणं कठीण होतं. तर 9.40 ची वेळ मात्र इंडिगोने पाळली आणि फायनली आम्ही बोर्ड केलं. पोराचा उत्साह पुन्हा वाढला. पहील्यांदा विमान प्रवास करायची उत्सुकता आणि तो दाखवण्याची पद्धत वयाला अनुसरूनच होती, पण मला तरी मध्येच हसू येत होतं. साहेबांसाठी दोन्ही फ्लाईट्स मध्ये आम्ही विन्डो सीट घेतली होती. कानात आईने ने दिलेले इअर प्लग्स घातले होते, तरी त्याचे कान लँड होई पर्यंत थोडे दुखू लागले होते.म्हणून जरा कुरकुरत होता.
12.05 वाजता दिल्लीला लँड झालो. आत सांगितलेलं 11 डिग्री तापमान बाहेर पडल्यावर लगेच बोचयला लागलं. मुबंईकरांसाठी 11 डिग्री म्हणजे “खूप थंडी”. हा विचार मनात आल्यावर देव म्हणाला असेल पण खरी गंमत पुढेच आहे! पुढची फ्लाईट अजून अर्धा तास डिले झाल्याचा मेसेज आला. नवी वेळ 1.10ची होती, बोर्डिंग 12.35ला. तर आता टर्मिनल बदलायचं होतं दुसऱ्या फ्लाईट साठी. मला वाटलं होतं असेल जवळ, पोहोचू पटकन. उतरल्यावर एअर्बसमध्ये चढायच्या आधी तिथल्या असिस्टंटसना विचारलं तर म्हणे 20-25 मिनिटे लागतील इथून. 12.15 होऊन गेले होते. एअर बसने टर्मिनल ला पोहोचल्यावर एका अससिस्टंटने एका काउंटरवर जाऊन काहीतरी बोलून कॅब करून दिली. ड्रायव्हरला विचारलं तर म्हणे 15 मिनिटे लागतील. वाटेत ट्राफिक लागलं थोडं. अविघन्य चे कान अजूनही दुखत होते. तो म्हणू लागला इथून आपण कारने जाऊया मम्मा. त्याला कसंतरी समजावलं. 12.30 झाले. म्हटलं आता काही खरं नाही. 12.35 ला त्या दुसऱ्या टर्मिनल ला पोहोचलो. सेक्युरिटी करून बोर्डिंग गेट वर धावत धावत पोहोचलो तर फायनल कॉल चालू होता. धावतच एअरबसमध्ये पोहोचलो.
फ्लाईट मध्ये माझ्या शेजारी श्रीनगर ची एक बाई. माहेरी कोणीतरी वारलं होतं म्हणून अर्जंटली पहिल्यांदाच एकटी फ्लाईट ने चालली होती. आधीच मला बोलून टेक ऑफ आणि लँडिंग ला माझा हात घट्ट धरून ठेवला होता 😊
छान गप्पा मारत आलो. तिथली जुजबी माहिती तिच्या कडून घेतली आणि तिने तिचा फोन नंबर सुद्धा घेऊन ठेवला. बोलली काहीही लागलं तरी कधीही फोन कर. आणि एअरपोर्टवरच मुलाचे कपडे बदल, त्याला थर्मल्स आणि दुसरा जॅकेट घाल, खूप थंडी आहे. प्रवासात भेटलेली पहिली चांगली व्यक्ती. श्रीनगर ला उतरल्यावर ड्रायव्हरने फोन केला, तो बाहेर थांबलेलाच होता. 3.30 झाले होते.
बाहेर पडताच थोडा बर्फ दिसल्याबरोबर लेक खुश! त्याला ग्लोव्हज आणि वुलन कॅप घातली. गाडीत बसल्यावर फोन बघते तर व्हाट्सएप वर शेवटचा मेसेज 12.20 ला. ड्रायव्हरला विचारलं हॉटेलमध्ये वाय फाय असेल ना.
“मॅडम, नेट तो यहा 4 महिनोसे बंद है।“
स्ट्राईक 1: म्हणजे 4 दिवस घरी व्हिडीयो कॉल्स नाही, सगळीकडे फिरू पण एकही फोटो कोणालाही शेअर करता येणार नाही की एफबी इंस्टा वर टाकता येणार नाही. इतका काळ नेट जवळ नसल्याची ही पहिलीच वेळ. त्यात एकटी मुलाला घेऊन बाहेर आलेली असताना.
पण म्हटलं असुदे. आपल्याला काय फिरायचं आहे, मजा करायची आहे. तसंही लेक अगदी किंग ऑफ मिस्चीफ आहे, त्याच्या कडे व्यवस्थित लक्ष देता येईल, कसलंच डिस्ट्रक्शन नको. आई डॅडीनी अगदी कडक शब्दात त्याची नीट काळजी घ्यायचं आणि त्याला अजिबात एकटं सोडायचं नाही हे बजावलं होतंच. ही आम्हा दोघांना जाऊ देण्याची त्यांची बेसिक अट होती. हॉटेल, रूम सगळं छान होतं, पण थंडी मरणाची. हिटरला काही ऐकत नव्हती. रात्र होत गेली तशी थर्मल्स, त्यावर कपडे, त्यावर जॅकेट आणि ग्लोव्हज, सॉक्स आणि कानटोपी इतका जामानिमा असून सुद्धा कुडकुडत होतो. मला कळेना की गारवा येतोय कुठून ह्या बंद खोलीत. शेवटी खिडकीचा पडदा बाजूला सारून नीट बघितलं तर एका बाजूचं तावदान उघडं होतं, तिथे जाळीचं दार होतं. ते उघडून बाहेरचं खिडकीचं तावदान लावलं आणि जाळीचे दार लावून घेतलं. खिडकीला लागून लांबच लांब एक युनिट होतं ज्याला संपूर्ण आत पाईप्स होते रूम मध्ये सोडलेले. त्यातून पण गार हवा येत होती. काय होतं कुणास ठाऊक. त्यावर बेडवरच्या मोठ्या उशा लावल्या.तेव्हा गारवा गेला बऱ्यापैकी. लेकाला थंडीची तशी काही चिंता नव्हती. त्याला मोबाईल मिळाला नाही नेट नाही म्हणून. पण टी.व्ही होता त्याच्या दिमतीला. मराठी चॅनेल्स नव्हते पण त्याचे कार्टून्स चालू होते.
दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून साईटसीइंग ला निघालो. पहिल्यांदा डोंगराच्या माथ्यावर असलेलं शंकराचार्य मंदिर पहायचं होतं. जमिनीपासून 1000 फूट उंच असलेल्या मंदिराला जवळजवळ 250 पायऱ्या आहेत. हे मंदिर नवव्या शतकात काश्मीरच्या संदिमान राजाने बांधल्याची आख्यायिका आहे. त्यानंतर झालेल्या अनेक राजांनी मंदिराचं दुरुस्ती काम केलं आणि मंदिराला नीट मेंटेन केलं. ह्यात काही मुस्लिम राजे ही होते. हे पूर्वी बुध्द लोकांचं ही मंदिर मानलं जायचं. पण श्री आदी शंकर इकडे येऊन गेल्या नंतर ह्या मंदिराचं नाव शंकराचार्य मंदिर पडलं. ह्या बद्दल एक अशीही आख्यायिका आहे की गोपादित्य राजाने 371 बी.सी काळात गोपाद्री डोंगरावरची ही जागा ब्राह्मणांना मंदिर बांधण्यासाठी दिली होती. त्याच्या आजूबाजूला त्याने भुक्सीर्वतीका नावाचं गाव वसवले. मंदिराचं बांधकाम आणि पायऱ्या संपूर्ण दगडी आहेत. त्यामुळे आणि इतक्या उंचावर असल्यामुळे थंडी जास्तच जाणवते. वर मोबाईल न्यायला मनाई होती. म्हणून ते अर्धा किलोमीटर लांब उभ्या केलेल्या गाडीतच ठेवून निघालो. माझं सेक्युरिटी चेक झालं आणि तिथे तैनात असलेल्या crpf च्या जावनाने पाहिलं की आम्ही दोघेच वर चाललो आहोत. त्याने आम्हाला थांबवून संपूर्ण डिटल्स रजिस्टर मध्ये लिहायला सांगितले, “आपके साथ कोई मेल नाही है ना. आप और बच्चा ही है”
वर चढताना अक्षरशः दहा पायऱ्या चढून थांबावं लागत होतं. हातपाय गोठले जात होते जणू. श्वास घेताना पण नाका तोंडातून वाफा येत होत्या आणि गार वाऱ्यात घेतलेल्या श्वासांनी शरीर आतून सुद्धा गार पडत होतं. वर पोहोचलो. वरून संपूर्ण श्रीनगर शहर दिसत होतं. अथांग पसरलेला दाल सरोवर जणू अर्धाअधिक शहराला वेढा घालून बसला होता, एखाद्या राजाच्या डोक्यावरच्या भल्या मोठ्या मुकुटासारखा! गाभाऱ्यात जायला आणखी उभ्या उंच आणि पाण्याने भिजलेल्या पायऱ्या होत्या. सॉक्स आणि बूट काढून त्यावर चढावं लागलं. पाय बधीर झाले दर्शन घेऊन सॉक्स घालेपर्यंत. तिथल्या दोघा-तिघानी शेकोटी केली होती त्याजवळ जरा थांबलो आणि मग खाली उतरलो. खाली काही लोकांनी भंडारा चालू केला होता. तिथे त्यांनी खायला लावलं. मस्त गरमागरम पुऱ्या, चण्याची भाजी आणि खीर. ब्रेकफास्ट करून आलो होतो म्हणून थोडंसं खाऊन निघालो.
पुढे आम्हाला मुघल गार्डन्स ना जायचं होतं. तसे 6 गार्डन्स आहेत. पण आम्ही 3 गार्डन्स पाहिले: चेश्मा शाही, निशात बाग आणि शालिमार बाग.दुसऱ्या शतकात बनवली गेलेली ही गार्डन्स आहेत. शालिमार बाग जहांगीर राजाने त्याच्या राणीला खुश करण्यासाठी बांधलं होतं.त्याच्या ह्या ड्रीम प्रोजेक्ट ला त्याने ‘फराह बक्ष’ असं नाव दिलं होतं. शालिमार बागेला प्रेमाचं निवासस्थान (abode of love) असंही म्हटलं जातं.सीझन नव्हता म्हणून गार्डन्स मध्ये फार काही बघायला नव्हतं. एप्रिल ते जून ही गार्डन्स अतिशय सूंदर रंगबेरंगी फुलांनी बहरलेली असतात. दिवसा जिथवर नजर जाईल तिथवर रंगांची उधळण आणि संध्याकाळी विविध रंगांच्या लाईट्सने वेढलेले उंच उंच अनेक फाउंटन्स. अशी ह्या गार्डन्स ची ख्याती होती, पण आमच्या नशिबात ते बघणं नव्हतं कारण आम्ही गेलो होतो डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत. सगळी झाडं सुकली होती. थंडीने जणू सगळं सौंदर्य रीतं करून टाकलं होतं.
तरी फोटो काढले.
काही काश्मिरी पोशाखात सुद्धा.
निशात आणि शालिमार बागेत थंडीत ही तग धरून जिद्दीने उभी राहिलेली थोडी फुलं दिसली.
शालिमार बागेत अचानक माझा फोन लो बॅटरी म्हणत स्विच ऑफ झाला. पूर्ण चार्ज करून आणलेला हॉटेल मधून, तीन तासात काय झालं कुणास ठाऊक. आता ड्रायव्हर ला कसं कॉन्टॅक्ट करणार? पण सुदैवाने तो बागेच्या बाहेरच उभा होता. पटकन त्याला फोन गाडीत चार्ज करायला लावायला सांगितलं. आणखी पुढे फोटो काढायचे होते.
तिन्ही गार्डन्स बघून झाल्यावर मग जेवलो. फ्लाईट मध्ये भेटलेल्या स्त्रीने काश्मीरी वाझवान नक्की ट्राय कर सांगितलं होतं. पण त्यातल्या सगळ्या डिशेस मटणाच्या बनवल्या जातात हे नंतर कळलं. कुठेच चिकन मध्ये नाही मिळालं. टूर मधला काश्मिरी काहवा मात्र घेतला. खरंतर साधा पिवळसर उकळून आणलेला चहा..पण चव!! फार सुंदर. थंडीत जणु संजीवनी! मी चहा घेत नाही, पण काहवा तिथे रोज प्यायले.
पुढे ड्रायव्हरने त्याच्या ओळखीच्या एक दुकानात नेलं. तिथे थोडा सुका मेवा आणि केशर घेतलं. अक्रोड आणि बदाम हाताने तोडून आणि दाबून त्यातून तेलाचा अंश निघताना मी तरी पहील्यांदाच पाहिलं त्या दुकानात. इतका अस्सल मेवा होता तिकडचा. तिथून दाल लेक ला गेलो. तिथे बोटिंग आणि थोडं साईटसीइंग केलं. दाल लेक म्हणजे पाण्यावर वसलेलं दोन लाखाहून अधिक लोकसंख्या असलेलं गावच होतं. समोर सगळ्या रांगेत हाऊसबोट्स होत्या आणि त्यांच्यापालिकडे गाव. जसं आपल्याकडे बाजारात किंवा कुठेही जायला टू व्हीलर्स-फॉर व्हीलर्स असतात तशी ह्याच्याकडे रो बॉट्स असतात.. आमचा गाईड कम नाविक म्हणे हॉटेल पेक्षा अतिशय सुंदर व्यवस्था असते इथे राहण्याची आणि खाण्याची.. मिशन काश्मीर सिनेमा आणि त्यातलं 'भूमरो भूमरो' गाणं ज्या हाऊसबोट मध्ये शूट झालं होतं तीही गाईडने दाखवली. तिथे कमळाचा आणि त्याखाली येणाऱ्या कमळककडीचं उत्पन्न होतं तो भाग त्याने दाखवला. कमळककडीची भाजी काश्मीर मध्ये खुप खाल्ली जाते, फेमस आहे. त्याच सोबत तिथे आणखी ही भाजीचं उत्पन्न घेतलं जातं म्हणे. पलीकडे हाऊसबोट मध्ये मालक राहतात. पण ह्या भागातून कोणी कधी काही काढून नेलं तर कोणालाच पत्ता लागत नाही. म्हणून ह्या भागाला म्हणे ‘चोरीका बागान’ म्हणतात
हया वेळेस सायबेरिया मधून स्थलांतर करून अनेक काळे बदक दाल लेक मध्ये येतात. त्यांना फ्लाईंग डक्स म्हटलं जातं. त्यांचे थवे च्या थवे पाहिले. सुर्यास्त होत आला होता. अतिशय सुंदर असं दृश्य होतं डाक सरोवरचं.
मधेच एक बाई अगदी बोटीच्या काठावर बसून आरामात बोट रो करून आमच्या समोरून निघून गेली, जशा आपल्याकडे गाड्या तशा तिथे तलावात बोटी. गम्मत वाटली. शेवटी नाविकाने तिथल्या लोकल मार्केट कडे नाव वळवली. ह्याचं नाव ‘मीना बझार’, पण ह्याला ' फ्लोटिंग मार्केट' असं ही म्हटलं जातं म्हणे. अख्खा बाजार होता तलावात..अगदी आपल्या रस्त्यावरच्या बाजारासारखा!
बोटीतून उतरेपर्यंत संध्याकाळी सव्वापाच होऊन गेले होते. बोटीत काढलेल्या फोटोंसाठी पैसे देता देता अचानक थंडी इतकी वाढली की हात पाय थरथरू लागले, दात वाजू लागले. पटकन गाडीत बसलो आणि हॉटेलवर आलो. ड्रायव्हर म्हणे इथे असंच टेम्प्रेचर ड्रॉप होतं, पटकन, कधीही. पावणे सहा वाजताच अंधारलं होतं! दिवस छान गेला. आता उद्या इथे चेक आउट करून गुलमर्ग ला जायचं होतं.